आपले प्रेम जेव्हा शेवटचा श्वास घेत होते, कोमेजत होते, ते मरणा आधी कोमात गेले होते. बघायचे नव्हते त्याला माझे हाल ह्या उघड्या डोळ्यांनी. म्हणूनच त्याने मिटून घेतले स्वतःला. एका गाढ निद्रेत गेला शोधायला तो स्वप्नाचा गाव. हिंडला, फिरला पूर्ण गाव त्याने धुडळला.. कोरड पडलेल्या घशानेच आवाज देत होता स्वतःला स्वतःच्या नटखट,अवली, मस्तिखोर, मिश्किल व्यक्तीमत्वाला कोरड्या घशाने शोधत होता प्रेमाचा ओलावा. पण नाही..... तिथे त्याला माझेच काही अवशेष सापडले छिन्नभिन्न झालेले मन, व्याकुळ आर्जवे, विनवण्यांचे लक्तरे.... मन खूप व्याकुळ झाले त्याचे तुझा मागमूसही नाही त्या गावी उगाच साद देत राहिला. सध्या ऐकलंय कोमात गेल्यावर त्याने आत्महत्या केलीय म्हणे... अनघा अनघा अतुल हिरे
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
फिरुनी नवी जन्मेन मी
दिवस सुरू झाला की मी गाणे लावते. पहिलं गाणं असत माणसाने माणसाशी माणसासम वागणे. एकीकडे काम चालू असते. खूपदा मनात हेच येत की मी सगळ्यांशी चांगल वागते. मला खूप लोक चांगले भेटले जे सतत मला मदत करायला तयार असतात. ज्यांना माझी खूप प्रगती झालेली पहायची आहे. आणि ते हर एक प्रकारे माझी मदत करत असतात. पण एक टक्का खराब, स्वार्थी, भामटे,लालची माणसे भेटतात. चांगल्या लोकांविषयी विचार केला तर मन आपोआप उत्साही होते. चेहऱ्यावर एक आनंद, मनाचे समाधान आणि त्या लोकांसाठी खूपसाऱ्या दुवा माझे मन मागतेच. त्रासदायक व्यक्ती विषयी मनात एकच विचार येतो. की ही व्यक्ती आपल्या आयुष्यात फक्त त्रास द्यायला आली नाही तर आपल्याला खूप काही शिकवून गेली. पुढचा बराच वेळ कदाचित ऑफिसला जाईपर्यंत डोक्यात हेच विचार घोळत असतात. ऑफिसला आले की एकीकडे लॅपटॉप चालू करायचा आणि गुलजारच्या गझल लावायच्या. पहिलं गाणं तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हू का नाराज नसावं मी जिंदगी वर? का हैराण होऊन तटस्थपणे बघत राहू. भरल्या डोळ्यांनी काम करत राहावं. केबिनच्या डोअरला नॉक झाले की आधी डोळ्याच्या कडा हलकेच भिरकवायच्या आणि हसतच स्मोरच्याशी बोलायच...
शब्द बापुडे केवळ वारा
बर्याचदा आपण एखाद्या वाक्याने ईतके disturb होतो........ काय असत बर त्या वाक्यात विशेष अस .....पण आपण सहसा त्या वाक्याकडे लक्ष नाही देत आपण फक्त ती भावना जगत असतो.वाक्याच्या मागील भाव काय आहे आपण याचाच विचार करतो पण ते बोचर वाटणार वाक्य आपण कधी खोलून बघतो का? खर म्हणजे समोरचा काहीतरी बोलतोय त्या वाक्याला खोलून बघितले तर बरेच गैरसमज दूर होऊ शकतात .पण नाही त्या क्षणाला त्या सगळ्या गोष्टी ईतक्या निष्क्रिय वाटत असतात आणि त्या मागची भावना हीच श्रेष्ठ ठरत असते.आणि मग भले मोठे गैरसमज करून आपण मोकळे होतो. आई मुलाला ओरडते किंवा नवरा बायकोला.... बायको नवर्याला बोलते कि आटपा लवकर, .....लवकर लवकर हात उचलता येत नाही का......गॅस चालू होता तुझं लक्ष कुठे होत.... हे साधे वाटणारे बोल काहीना अपमानास्पद वाटतात ...पण वाक्य खोलून बघायची सवय लावली तर लक्षात येईल कि त्या वाक्यात समोरच्या साठी फक्त काळजी आणि प्रेमच असते...आपल्या व्यक्तीला ओरडणे किव्हा त्याचा अपमान करणे हा हेतू कधीच नसतो तर त्याकडे नीट बघितलं तर समजते हि काळजीच आहे आणि काळजी हि प्रेमातूनच येते......मग त्या व्यक्तीचे प्रेम झिडकारून त्या ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा